भारत

तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दुपटीपर्यंत वाढीचा निर्णय:625 वरून 1 हजार रुपये, निमंत्रित व्याख्यात्यांना 1500 मानधन

राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन तसेच कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये म्हणून रिक्त पदांवर तासिका तत्त्वावर अध्यापक यांची नियुक्ती करण्यात येत असून तासिका अशा अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली. या निर्णयानुसार कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ६२५ रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास मानधन मिळेल. शिक्षणशास्त्र , शारीरिक शिक्षण, विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रति तास मान

Read More
भारत

हिंदू ग्रंथांची पुन्हा समीक्षा व्हावी:सरसंघचालक म्हणाले – काही स्वार्थी लोकांनी धर्मग्रंथात काहीतरी टाकले जे चुकीचे आहे

सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्मग्रंथांची पुन्हा समीक्षा करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, 'आपल्याकडे पूर्वी ग्रंथ नव्हते. आपला धर्म मौखिक परंपरेतून चालत आला. पुढे धर्मग्रंथांची सरमिसळ झाली आणि काही स्वार्थी लोकांनी त्यात काहीतरी टाकले जे चुकीचे आहे. त्यामुळे त्या ग्रंथ व परंपरांच्या ज्ञानाची पुन्हा एकदा समीक्षा करणे आवश्यक आहे.' नागपूरच्या कान्होलीबारामध्ये आर्यभट्ट अॅस्ट्रोनॉमी पार्कच्या उद्घाटनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे. आपल्याकडे जगभरातील समस्यांवर तोडगा भागवत म्हणाले - "आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्या आधारावर आपली वाटचाल सुरू होती. पण परदेशी आक्रमणामुळे आपली व्यवस्था नष्ट झाली. आपल्या ज्ञानाची परंपरा खंडीत झाली. आपण खूप अस्थिर झालो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या परंपरेत काय आहे याचे किमान काही मूलभूत ज्ञान असले पाहिजे, जे शिक्षण व्यवस्थ

Read More